ऊसाच्या शेती सोबत केमिकल फ्री गुळ बनवत आहे हा शेतकरी , या योजनेचा झाला फायदा
ऊसाच्या शेती सोबत केमिकल फ्री गुळ बनवत आहे हा शेतकरी , या योजनेचा झाला फायदा. शेती आणि फलोत्पादन हे रोजगाराचे प्रमुख साधन असलेला जम्मू काश्मीर आता अन्न प्रक्रिया उद्योगात सुध्दा अग्रेसर होऊ पाहत आहे. अशीच गोष्ट आहे जम्मू काश्मीर मधील उधमपूर जिल्हयातील केवल कुमार या शेतकऱ्याची , केवल कुमार यांनी सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस या योजनेच्या माध्यमातून स्वत:चे रसायनमुक्त गूळ बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या उद्योगात भरारी घेतली आहे. उधमपूर जिल्ह्यातील धानु गावातील केवल कुमार यांनी या योजनेच्या फायदा घेत आपल्या ऊस प्रक्रिया क्षमतेत सुध्दा लक्षणीय सुधारणा केली आहे.
जम्मू काश्मीर मधील लोकांसाठी शेती आणि फलोत्पादन हे रोजगाराचे प्रमुख स्त्रोत आहेत. आता या भागातील लोक शेतकरी कृषी व्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगातही आपले नशीब आजमावत आहेत. उधमपूर जिल्ह्यात या आगोदर फक्त गहू आणि भाताची लागवड करायचे , पण यातून त्यांना पुरेसा नफा मिळत नव्हता. आता केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा घेत येथील लोक ऊसाची लागवड करत आहेत. आणि त्या उत्पादनापासून रसायनमुक्त गूळ बनवून बाजारात विकत आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. आणि रसायनमुक्त गुळाची मागणी सुध्दा वाढली आहे.
केंद्राच्या या योजनेचा फायदा घेत आहेत शेतकरी
उधमपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस या योजनेचा फायदा घेत आहेत. ज्यामुळे त्यांच्या ऊस प्रक्रिया क्षमतेत सुधारणा झाली आहे. धानु गावातील शेतकरी केवल कुमार यांनी या योजनेच्या मदतीने स्वत:चे रसायनमुक्त गूळ बनवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पारंपारिक बैलगाडयांऐवजी उसाचा रस काढण्यासाठी ट्रॅक्टर वापरत आहेत. ज्यामुळे कामे जलद गतीने होत आहे. मजुरांची कमतरता सुध्दा भासत नाही.
हे पण वाचा : Gay gotha anudan yojna 2025
केमिकल फ्री गुळाची वाढती मागणी
शेतकरी केवल कुमार सांगतात की पूर्वी जम्मू कश्मीर मधील लोक गहू आणि भाताचे लागवड करायचे आता त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान मिळू लागलं त्याच्यामुळे उसाची लागवड वाढत आहे. ट्रॅक्टर वर सुद्धा अनुदान मिळत असल्याकारणाने ऊस पिकवायला आणि गुळ बनवायला त्यांनी सुरुवात केली गेल्यावर्षी त्यांनी बाजारात 15 ते 20 क्विंटल गूळ विकला या सर्व तंत्रज्ञानाच्या बदलामुळे त्यांच्या सेंद्रिय आणि रसायनमुक्त गुळाची वाढती मागणी पूर्ण करायला मदत झाली
रसायनमुक्त गुळाची वाढती मागणी
केवल कुमार म्हणाले की रसायनमुक्त शुद्ध सेंद्रिय गूळ मी तयार करतो हा गूळ बाजारात विकतो आणि लोकांच्या पसंतीला हा गुळ पडतो. आमच्या उत्पादनाची मागणी त्याच्यामुळे वाढली आहे. या उपक्रमाशी मी अनेक शेतकऱ्यांना जोडले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी स्वावलंबी झाले आहेत, कुमार म्हणाले की पूर्वी या भागातील परिस्थिती खूप वाईट होती. आम्हाला शेतात काम करायला आवडायचं नाही कारण शेतीमधून नफा मिळत नव्हता, पूर्वी लोक कर्जात बुडाले होते. परंतु, आता ही परिस्थिती नाही जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही आर्थिक समस्येची गरज जाणवते तेव्हा आम्ही किसान क्रेडिट कार्ड कडून कर्ज घेतो आणि सहा महिन्याच्या आत ते परत करतो.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना फायदा
उधमपूर मधील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत सरकारच्या प्रयत्नाने टिकरी जिल्हा विकास परिषदेचे सदस्य अशू शर्मा यांनी याचं कौतुक केलेल आहे. ते सांगतात की, आमच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत क्रांती घडवून आणायला मदत केली आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना पॉलिहाऊस सारख्या नवीन पद्धती स्वीकारण्याला मदत झालेली आहे. पॉलिहाऊसच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट सारखी नवीन पिके घेण्यात सुद्धा मदत झालेले आहे. तसच केवल कुमार सारख्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून रसायनमुक्त गुळ बनवला त्याच्यामुळे त्या गुळास मागणी वाढली.
अधिक माहिती : हे वाचा
1 thought on “ऊसाच्या शेती सोबत केमिकल फ्री गुळ बनवत आहे हा शेतकरी , या योजनेचा झाला फायदा”