Swamitva yojna

Swamitva yojna: सध्या गाव असो की शहर मालमत्तेबाबत वाद विवाद व न्यायालयीन खटले सर्वत्र पहायला मिळतात. याचसाठी केंद्र सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. नमस्कार मित्रानो किसान विचारमंच या ब्लॉगमध्ये तुमच स्वागत आहे.

Swamitva yojana
Swamitva yojana

Swamitva yojna

आज आपण Swamitva yojna याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिनांक 18 जानेवारी रोजी सांगितले की स्वामित्व योजनेतर्गंत देशातील सर्व गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वितरित केली जाणार आहेत. देशभरात जवळपास 65 लाखहून अधिक प्रॉपर्टी कार्ड वितरित करत असताना मोदीनी संबोधित केले. खेड्यातील जवळपास 2.25 कोटी लोकांना आतापर्यंत या योजनेंतर्गत त्यांच्या घरांसाठी कायदेशीर कागदपत्रे मिळाली आहेत.

Swamitva yojna म्हणजे काय ?

तंत्रज्ञानाच्या सहायाने गावातील व खेडयापाड्यात राहणाऱ्या लोकांच्या घराचे सर्वेक्षण करून त्याचे मॅपिंग करणे व त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ड्रोनच्या सहायाने गावातील मालमत्तेचे सर्वेक्षण करणे तसेच जीआयएस आधारित नकाशे तयार करणे हे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार करणार आहे.

Swamitva yojna कधी सुरू झाली?

२४ एप्रिल २०२० रोजी राष्ट्रीय पंचायती राजदिनी पंतप्रधान मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. त्याच वर्षी ११ ऑक्टोबरपासून प्रॉपर्टी कार्डांचे वितरण सुरू झाले.

अधिक वाचा : PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी 

Swamitva yojna च्या माध्यमातून मिळणाऱ्या कार्डचा फायदा काय?

केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या मते या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील लोकांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. कारण या योजनेतर्गंत ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालमत्तेवर कर्ज आणि इतर आर्थिक लाभाचा फायदा घेता येणार आहे. सरकार मार्फत मिळालेल्या कायदेशीर कागदपत्राच्या आधारे लाखो लोकांनी त्यांच्या घराच्या तसेच मालमत्तेच्या आधारावर बँकाकडून कर्ज घेतले आहेत. या कर्ज रूपी पैशाच्या माध्यमातून लोकांनी वेगवेगळया प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत.तसेच या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जमिनीच्या अचूक नोंदी तयार करण्याचा मार्ग दखील मोकळा झाला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या नोंदी आणि नकाशे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाला करआकारणी , वेगवेगळे परवाने , अतिक्रमणे हटवणे इत्यादी गोष्टी करण्यास सुलभता प्राप्त होणार आहे.

Swamitva yojna कोणत्या प्रकारे राबवली जाणार आहे.

Swamitva yojna ची सुरूवात सर्व्हे ऑफ इंडिया व राज्य सरकारांमधील सामंजस्य कराराने होणार आहे.  सर्व्हे ऑफ इंडिया डेटाबेस तयार करण्यासाठी व टोपोग्राफिकल मॅपिंगसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून एअरबोर्न फोटोग्राफिक ड्रोन उपग्रह प्रतिमा व ड्रोन प्लॅटफॉर्मच्या वापर केला जाईल.

स्वामित्व कार्डचा फायदा मिळाल्यानंतर गाव खेड्यातील अनेक भागात महत्वाचे बदल होतील. जस की लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा असेल त्यामुळे जमिनीचे वाद कमी होतील. तसेच गावातील लोकांना या कार्डच्या आधारे कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

1 thought on “Swamitva yojna”

Leave a Comment